मधमाशा [ honey bees ].

हल्ली स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणारे न चुकता साखर खाण्याऐवजी मध खातात . मधमाशी हा अतीव महत्वाचा कीटक ह्या मधुर रसाची निर्मिती करतो. मध बनवणाऱ्या, किटक वर्गात मोडणाऱ्या एपिडाइ कुटुंबातल्या [ Apidae family ] या जीवाबद्दल, अर्थात मधामाशांबद्दल आपल्याला विशेष माहिती नसतेच. आजच्या गप्पा मधमाशीबद्दल

मधमाशा या कीटक आहेत [ honey bees ]. माणसाप्रमाणेच ह्या माशा पण एकत्र रहातात. यांच घर म्हणजेच पोळं हे मेणापासुन बनवलेल असतं. यातल्या खोल्या षट्कोनी म्हणजेच हेग्ज्यागोनल असतात. आपल्या घरात जसं प्रत्येकजण आपापली नेमुन दिलेली काम करत असतो तसच मुंग्या, वाळव्या नी मधमाशांमधेही कामाची वाटणी केलेली असते. महत्वाच म्हणजे त्या बद्दल कोणीच तक्रार करत नाही. त्यांच्या पोळ्यात एकच राणी माशी असते नी तिचे काम फ़क्त अंडी घालण हेच असतं. ह्या राणी माशीसाठी अनेक नर मधमाशा पोळ्यात असतात जे फ़क्त नावापुरते बाबा असतात. पिल्लांचा जन्म झाला की ह्यांना चक्क पोळ्याबाहेर हाकलुन दिलं जातं. हे नर, राणी माशीपेक्षा थोडे लहान असतात. त्यांना पोळ्याबाहेर हाकलुन दिल्यावर ते जास्त काळ जगत नाहीत.

madhmashi2madhmashi5

ह्या पोळ्यातला सगळ्यात मोट्ठा नी महत्वाचा घटक म्हणजे कामकरी माश्या. ज्या सतत काम करत असतात. ह्या सगळ्या कामकरी माशा माद्या असल्या तरिही कधीच अंडी घालु शकत नाहीत. या पोळ्यात राहणारी राणी माशी स्वत: अन्न कधीच आणत नाही तर तिला या कामकरी माशाच अन्न आणुन देतात. खास म्हणजे, प्रत्येक पोळ्यातल्या राणीची स्वत:ची हद्द असते नी शरीरातुन एक खास केमिकल सोडुन ती स्वत:ची हद्द आखुन ती इतरांना सांगते की इथे माझी हद्द आहे. आणी त्या हद्दीची राखणसुद्धा ती करते. साधारंण ४/५ वर्ष ही राणीमाशी जगते नी त्याकाळात बाकीच्या कामकरी माशा हिची सगळी कामं करतात. ही राणीमाशी जी अंडी घालते, त्यातुन बाहेर आलेल्या अळीपिल्लांची काळजीपण ह्याच कामकरी माशा घेतात.

madhamashi1madh5

मधमाश्यांच्या पोळ्याला हाइव [ Hive ] म्हणतात. एका पोळ्यात साधारणपणे ५० ते ६० हजार कामकरी माशा रहातात. या पोळ्यात एक मज्जा होते दरवर्षी. घरातील लहान मुलाना थंडी वाजु नये म्हणुन आया थंडीच्या दिवसात मुलांची काळजी घेतात. पण ह्या पोळ्यात ह्याच्या अगदी उलटा प्रकार असतो. जेव्हा थंडी सुरु होते, तेव्हा ह्या सगळ्या कामकरी माशा राणी माशीच्या भोवती राहुन तिचं थंडीपासुन रक्षण करतात. राणी माशी होणं म्हणजे हाऊ लक्की ना?
ही राणी माशी चुकून आधीच मेली, तर अनेक दिवस ह्या कामकरी माशा नेमून दिलेली कामे करत रहातात. नंतर आधीच्या अंड्यातून जन्माला आलेली एखादी राणीमाशी हे पोळं वारसा हक्काने पुढे चालवते. जर असे झाले नाही तर ह्या पोळ्याला उतरती कळा लागून पोळ्याचा नाश होतो.

प्रत्येक राजाकडे असतं तसच ह्या राणीमाशी कडे तिचं स्वत:चं एक हेरखातं असतं. हे उडते हेर दुरदूर उडत जाउन नेक्टर्स म्हणजेच मकरंद असणारी फ़ुलं कुठल्या एरीयात आहे हे शोधतात. जेव्हा ह्या मधमाशा पोळ्याजवळ येऊन “गुउउउउउउउउउउउईईईईईईईईईईईईईईईईईईग्गउउउउउउउउउउउईईईईईईईईईईईईईईईईईईग्ग्ग्ग्ग्ग्ग” करुन ईंग्रजी भाषेतला लॊंग एट किंवा मराठी भाषेतला आठाचा आकडा होइल असां ,अर्ध वर्तुळ नाच करताना दिसतात तेव्हा खुशाल समजायच की त्यांचा हा नाच म्हणजे मधाच्या फ़ुलांचा नविन ठिकाणा मिळालाय हे कामकरी माशांना सांगण्याचा सिग्नल असतो. मग काय? निघते राणीची ही कामकरी माशांची फ़ौज मध गोळा करायच्या मोहिमेवर. जेव्हा मध आणला जातो, तेव्हा तो पोळ्यातल्या षट्कोनी खोलीत साठवला जातो नी ती खोली भरली की मेणानेच सील करुन बंद केली जाते. आता सांगा , एवढ्या मेहनतीने गोळा करुन मध आणल्यावर त्याची राखण त्या प्राणपणाने का नाही करणार?

ह्या मधमाशा चिडक्या असल्यातरी शक्यतो कुणाच्या वाटेला जात नाहीत. पण कुणी त्रास दिलातर मात्र त्या शत्रुची काही खैर नसते. जेव्हा ह्या माशा चावतात तेव्हा त्या त्यांच्या नांग्या त्या शत्रुच्या शरीरात खुपसतात. ह्या घुसवलेल्या नांग्या शरीरातुन बाहेर काढता नाही आल्यातर माशा त्या नांग्या तोडुन टाकतात.अशा घायाळ माशा मरुन जातात. ह्यालाच म्हणतात मधमाशीचा डंख! आणी ह्या डंखाने बर्याचवेळेस माणसं मरुनपण जातात. मधमाशा खातात काय हा प्रश्न अनेकांनी विचारल्यामुळे मी हा परिच्छेद नव्याने घातलाय . कामकरी माशा , फुलांचे परागकण आणि फुलातील मधुरस खातात. पोळ्यात असलेली त्यांची अंडी पिल्ली अर्थात लार्वी मध खातात नी राणी माशी ही कामकरी माशांच्या डोक्या जवळील ग्रंथी मधून निघालेला रॉयल जेली नावाच्या द्रवावर जगते. ही जेली बहुतेक प्रोटीनयुक्त अशी असते. यात अमिनो एसिड्स , पाणी , व्हिट्यामिन्स , सत्व, क्षार असतात.

माणसाने कितीही प्रगती केली तरी त्याला अजुन मधमाशी सारखा मध काही बनवता आला नाहिये. मुंग्या,मधमाशा ह्या निसर्गातल्या खुप लहान घटक आहेत पण त्यांच काम कित्ती महत्वाच आहे नाही? निसर्गातल्या ह्या लहान सहान घटकांकडुन कायम आपण काहीतरी शिकणं गरजेच असतं. डोळे उघडे ठेवून नी मेंदू जागृत ठेवून या लहानसहान घटकांकडे निट पाहिलं तर आपल्याला खूप काही शिकायला मिळतं